Sunday, September 2, 2018

पु.ल.... मला भावलेले!!!

    पु.ल.... मला भावलेले!!!

     देव व धर्म ह्या धूर्त कल्पना सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी  वापरलेल्या आहेत. हेही म्हटले तर पुन्हा पुलंचीच शब्द येतात ,आणि बरोबरही आहे, प्रत्येक ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी शिरकाव केलेला दिसतो आणि देवाबद्दल असलेल्या श्रद्धेपेक्षा विशिष्ट लोकांच्या गटाचा तिथे प्रभाव दिसतो.
      निवडणुकीच्या वेळी या धार्मिक ,श्रद्धाळू भक्तांचा गैरफायदा घेऊन त्यांना आपल्याकडे ओढले जाते. भीतीपोटी लोकही नको असलेल्या समूहांना पाठिंबा देतात. त्याबरोबरच  अधंश्रध्देची  जोड  मिळाल्यावर भोंदू तिथले संस्थानिक होतात. येणारा भक्त त्यांची प्रजा असते. हिच  प्रजा मानसिक गुलाम कधी होते हे  कळत नाही .
    गुलामगिरी स्वीकारल्यावर मग आपण  स्वतंत्रपणे विचारच करत नाही .भोंदूगिरी करणारे बुवा आणि राजकारणी जेव्हा एकत्र येतात ,तिथेच मग सौदेबाजी सुरू होते म्हणून आपण डोळसपणाने देव अनुभवावा , नाहीतर दहा-दहा हजार करोडचे आसाराम बापू कधी तयार होतात,हे भक्तांना कळेपर्यंत फार ऊशीर झालेला असतो.
      म्हणुनच देवावरची भक्ती असो, किवां राजकारणातील शक्ती, हि डोळसपणे तपासायला हवी...  कुठल्याही लाटेत वहावत जाणे..हे धोकेदायक आहे.

पद्मा साहेबराव... 


No comments:

Post a Comment