विचार मंथन-
काल,आज आणि ऊद्या ???
आज डोळ्यादेखतं अन्याय घडताहेत .धर्माच्या जोडीला प्रांत आणि भाषा रक्तपाताची कारणं होऊ घातले आहेत. आणि हे खूप खरे आहे. म्हणजे त्यांनी (पुलंनी) ज्यावेळेस हा विचार मांडला असेल ,तेव्हा आजच्यासारखीच परिस्थिती असेल का? हो ,नक्कीच! कारण, विनोदी अंगाने सर्व लिखाण करणारे पु.लं जेव्हा असा विचार मांडतात ,तेव्हा नक्कीच त्याचं गांभीर्य लक्षात घ्यायला हवे.
आजही आपण समाजात वावरतो ,निरीक्षण करतो तर आपल्याला हेच दिसतं की,आज तर सोशल मीडियामुळे आपल्याला जगात काय चाललंय, ते घरात बसून समजतं .तेव्हा कुठल्याही अन्यायावर, न आवडणाऱ्या घटनांवर काही आवाज उठवला तर तेथे रक्तपात ,जाळपोळ, झुंडशाहीने होणारे हल्ले हे त्याचेच उदाहरण आहे.
जगात सोडाच ,पण भारतात धर्म ,प्रांत ,भाषा यावरून दंगली घडत आहेत. त्या बरोबरच आणखी म्हणजे वैचारिक स्वातंत्र्यावर बंधने येत आहेत . हिंदुत्वाच्या नावाखाली पुरोगामी विचारांच्या व्यक्तींचीही इथे हत्या केली जाते आहे.सामान्य लोकांची सुरक्षितपणाची भावना कमी होत चालली आहे.कोणावरही कोणाचा विश्वास राहिला नाही,इतकी आपली लोकशाही केविलवाणी झाली .
धर्माच्या जोडीला जातीयवादाच पारडे जड होतंय .तरुण वर्गही बेरोजगार आहे. काम नसल्यामुळे त्यांचे माथी भडकवण्याचे काम हे काही राजकारण्यांकडून करून घेतलं जातंय .नोकरीच, शिक्षणाचं आमिष त्यांना दाखवले जाते .त्यात त्यांना वेगवेगळ्या जाती मध्ये विभागून आरक्षणाचे गाजर ही दाखवले जातात .आणि मग मागण्या मान्य झाल्या नाहीत ,तर हेच तरूण रक्त झुंडशाहीने विघातक गोष्टींकडे वळत आहे. मला असं वाटतं की, माणसाची वाटणी ही प्रांत, भाषा धर्माबरोबरच आता जाती- जातीत होऊ लागली आहे.
अशा सर्व गोष्टींचा लेखाजोखा घेतला तर आपण समाजात माणूस म्हणून जगताना, हे जे मी काय करतोय.. ते बरोबर आहे की नाही, याचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे.
पद्मा साहेबराव...!
आजही आपण समाजात वावरतो ,निरीक्षण करतो तर आपल्याला हेच दिसतं की,आज तर सोशल मीडियामुळे आपल्याला जगात काय चाललंय, ते घरात बसून समजतं .तेव्हा कुठल्याही अन्यायावर, न आवडणाऱ्या घटनांवर काही आवाज उठवला तर तेथे रक्तपात ,जाळपोळ, झुंडशाहीने होणारे हल्ले हे त्याचेच उदाहरण आहे.
जगात सोडाच ,पण भारतात धर्म ,प्रांत ,भाषा यावरून दंगली घडत आहेत. त्या बरोबरच आणखी म्हणजे वैचारिक स्वातंत्र्यावर बंधने येत आहेत . हिंदुत्वाच्या नावाखाली पुरोगामी विचारांच्या व्यक्तींचीही इथे हत्या केली जाते आहे.सामान्य लोकांची सुरक्षितपणाची भावना कमी होत चालली आहे.कोणावरही कोणाचा विश्वास राहिला नाही,इतकी आपली लोकशाही केविलवाणी झाली .
धर्माच्या जोडीला जातीयवादाच पारडे जड होतंय .तरुण वर्गही बेरोजगार आहे. काम नसल्यामुळे त्यांचे माथी भडकवण्याचे काम हे काही राजकारण्यांकडून करून घेतलं जातंय .नोकरीच, शिक्षणाचं आमिष त्यांना दाखवले जाते .त्यात त्यांना वेगवेगळ्या जाती मध्ये विभागून आरक्षणाचे गाजर ही दाखवले जातात .आणि मग मागण्या मान्य झाल्या नाहीत ,तर हेच तरूण रक्त झुंडशाहीने विघातक गोष्टींकडे वळत आहे. मला असं वाटतं की, माणसाची वाटणी ही प्रांत, भाषा धर्माबरोबरच आता जाती- जातीत होऊ लागली आहे.
अशा सर्व गोष्टींचा लेखाजोखा घेतला तर आपण समाजात माणूस म्हणून जगताना, हे जे मी काय करतोय.. ते बरोबर आहे की नाही, याचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे.
पद्मा साहेबराव...!
सत्य परिस्थिती मांडली आहे!खूप छान लेख!
ReplyDeleteखरच खूप छान विचार मांडले आहेत सर्वाना विचार करायला लावणारी गोष्ट आहे
ReplyDeleteNice
ReplyDeleteखुप छान लेख
ReplyDeleteMojkyach shabdat lekh parntu sakhol vichar manthan sundar......
ReplyDeleteNice
ReplyDeleteअतिशय सुंदर
ReplyDelete