Sunday, November 24, 2019

महा-राष्ट्र कारण...की..भष्ट्रकारण...?

पक्ष्यांपेक्षा ही दैन्यावस्था राजकारण्यांची झाली आहे... म्हणजे आकाशात सहजपणे फिरणारे पक्षी तरी स्वतः ची ओळख टिकून ठेवतात पण,आजचे नेते या पक्षांतर करताना कारणे काय दाखवतात तर कार्यकर्त्यांची "इच्छा"?? मतदार संघाचा "विकास".???प्रत्येक निवडणूकीत नेत्यांच्या मागेपुढे पळणारे साधी माणसं पाहिली आणि खूप त्रास झाला... कारण हे राजकारणी सामान्य जनतेला गृहीत धरतात, आपल्याबरोबर त्यांनाही पक्षांतराची भुरळ घालतात.. मला नवल याचं वाटतं, की,विचार शक्ती च गमावून बसतो आपण...सत्तेसाठी नेते मतदारांना वेड्यात काढतात. पण मतदाराने विचार करायला हवा की आधी असलेल्या पक्षात "आपल्या" नेत्यांनी सत्ता उपभोगली असते, पदेही मिळवलेली असतात, स्वतःचा विकास केलेला असतो.. सामान्यांना काय मिळते....! त्यांच्या मागे फिरून कोणते प्रश्न सुटतात?? किती बेसिक गरजा पूर्ण होतात ? किती बेरोजगारी कमी होते?? किती शेतकऱ्यांचे प्रश्न- कामगारांचे प्रश्न, ह्याला कुठला न्याय मिळालेला असतो??? या लोकांच्या भूलथापांना बळी पडून आपण आपला विकास थांबवला आहे.. आता तर कोणत्याही पक्षाला बहुमत नसताना सुद्धा किती हा अहंकार..! विधानसभा निवडणुका झाल्या, मी-मी म्हणणार्यांना जागा दाखवली गेली,आमचं सरकार-आपलं सरकार म्हणतांना राष्ट्रपती राजवट लागू होते..व्वा.. किती दुर्दैव..! पण आता मतदार राजा सुज्ञ झाला आह बऱं का.. एकीकडे राज्यात शेतकऱ्यांना पावसाने झोडपले, करोडोंचे नुकसान झाले.. आणि प्रत्येक राजकारणी हा बांधां-बांधांवर जाऊ लागला फक्त फोटोसेशन झालं..बाकी कार्यवाही फार काहीच नाही... इकडे सत्तेची गणितं सोडवणं चालूच आहे.. बळीराजाच काय, पण प्रत्येक मतदाराला फसवलं जातंय... शेतकर्यांसारखेच प्रश्न कामगारांचे पण आहेत.. कंपन्या बंद पडल्या, कामगारांचे कुटुंब उध्वस्त व्हायला लागले, विद्यार्थ्यांना पदवीधर असूनही नोकरी मिळत नाही की बिझनेससाठी आर्थिक परिस्थिती नाही.. राजकारण्यांनो, एवढाच महाराष्ट्राचा कळवळा असेल ना, तर इतके दिवस आमच्या पैशांवर- मतांवर सत्तेत राहून केलेले घोटाळे, कमावलेली गडगंज संपत्ती द्या ना समाजाला मोकळी करून... सात पिढ्यांना पुरेल एवढं मिळवलेले उत्पन्न द्या या समाजात वाटून, जिथे माणसांना दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे!.. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही सरकारची गरज नाही.कुठलेही ऊत्पन्नाचे साधन नसतानाही ह्यांच्या मुलांच्या नावावर करोडोंच्या मिळकती, आमच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी कर्ज घ्यावे लागते किंवा शिक्षण अर्धवट सोडावे लागते. पण, आता जे घडतं आहे ते बरं होईल.. हे त्रिशंकू सरकार निदाान काम करताना एकमेकांना विचारून, एकमेकांच्या दबावाने निर्णय घेतील.. बहुमत जर एकाच पक्षाला असतं तर ती वाटचाल हुकूमशाहीकडे होत होती, आता मात्र प्रत्येक पक्षाचा विचार घेतला जाईल त्यातून काही चांगले घडावे हीच "इच्छा"....! वरच्या लिखाणाला "पूर्णविराम" दिला नाही, तोच बातमी कानावर आली की अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस बरोबर रात्रीतून सरकार स्थापन केल.???? किती "गलिच्छ" राजकारण.. पुढे जाऊन तर मी म्हणेन की हा "सामाजिक व्यभिचार" आहे... किती फसवणूक ही जनतेची??? कुठल्या पातळीवर जावं याला काही मर्यादा असाव्यात.. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही , या राजकारण्यांनी स्थिर सरकार स्थापन करण्या पेक्षाही वैयक्तिक गोळा केलेली "माया" जरी बाहेर काढली, तिजोरी खुली करून ईतिहास घडवावा.. आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल ...तेव्हाच यांना शाहू, फुले व आंबेडकराचे नाव घेण्याचा अधिकार आहे..।।यात काडीमात्र ही शंका नाही..!!!!!
पद्मा साहेबराव..।।

Friday, August 9, 2019

तांडव...!

तांडव..।।। देतोस सहश्र हाताने, तुला ग्रुहीतच धरत असतो, देता-देता घेऊन जातोस , आम्ही हतबल होतो ! पाणी म्हणजे जीवन होतं, पाणी म्हणजे मरण हेही दाखवून दिलं, गुरं-ढोरं बायका पोरं, सारंच वाहुन गेलं! नदी-नाले सोडून तू रस्त्यावर येतो , आमचेच काही चुकते का, अतिक्रमण करून, तुलाच बोलावून घेतो! इतका कोपलास तू ,घरा-दारात आलास, संसार सुखाचा तु,वाहवत नेला! इतका प्रेमळ कधी तू ,पानाफुलात वावरतो, तांडव तुझे बघुन आज,माणूस माणसाला सावरतो! तुझ्या रौद्र रूपाने मात्र,हे दाखवून दिलें, धर्म ,जात ,पंथ हे वाहतच गेलें, मदतीला फक्त हात कामास आले! देव तु की ,देव हा कळेनासं झांल, वाचवणार्या पायानांच मी देवपण दिलं! देवळातल्या देवा तु दिसला नाहीं कधी, तुझचं रुप घेऊन ते जवान आले आधी! आता जन्म मरणाच राजकारण होईल तुझ्या न्यायालयाचा निर्णय, श्रेय घेण्याचं राजकारण उफाळुन येईल....! @ पद्मासाहेबराव... नाशिक