Saturday, September 22, 2018

परदेश पर्यटन -एक अनुभव

      आपल्याकडे पासपोर्ट आहे म्हणजे आपण परदेशात पर्यटन करावं ,असा माझ्यासह बहुतेकांचा समज असतो. झालं असं की माझं नवऱ्याच्या परदेशातील नोकरीमुळे सात-आठ  वर्षांपूर्वी सौदी अरेबियात जाणं झालं होतं. तेही दोनदा…! परंतु ते  कुटुंबीयांसोबत. त्याला बरेच दिवस झाले होते . पण
      माझ्या भावाची मुलगी मयुरी हाँगकाँग ला असते. तिच्या डिलिव्हरीसाठी भाऊ वहिनी तिच्याकडे तीन महिन्यासाठी  गेलेले होते. ते वेगवेगळ्या ठिकाणचे फोटोज आम्हाला व्हाट्सअप वर पाठवत होते. ते बघुन माझ्याही मनात हाँगकाँग बघण्याचे स्वप्न साकारत होते. ती इच्छा मी घरात बोलून दाखवली , आणि मग काय... स्वप्न सत्यात उतरेल, असे मला वाटू लागले . सर्वांचा होकार...आलेली संधी घालवायची नव्हती. अट्टाहास एकच.. तुला एकटीला जावे लागेल. थोडी घाबरले होते. पण , इतका सहज आलेला होकार म्हणजे एका स्त्रीला पूर्ण स्वातंत्र्य होतं . त्याचा मला फायदा घ्यायचा होता.
       आता जाण्याची तयारी सुरू झाली. सगळे प्रोत्साहन देत होते. 22 जुलै 15 ही फ्लाईटचे बुकींग केले . प्रश्र्न एकच होता की, visa on arrival असणार होता. पंधरा दिवसांचा free visa! मयुरी मला तिकडचे नियम समजावून सांगत होती .
       माझ्या नवऱ्याचे बारा-तेरा देशात कंपनीमुळे जाणे- येणे झालेलं होतं.तेही खूप जास्त प्रमाणात अतिशय काळजी घेत सगळं काही मला समजावून सांगत होते. तोपर्यंत मला सोपे वाटत होते सगळे! जाण्याचा दिवस उजाडला तसं माझं चित्त थाऱ्यावर नव्हतं. कारण मुंबई एअरपोर्ट पासून मी अगदी एकटी असणार होते . सर्वांना मी खूप खंबीर वाटत होते. पण मनातून खूप घाबरलेली होते. त्याबरोबरच मला स्वतःला सिद्ध करायचे होते, आय कॅन डू इट!! मुंबई एअरपोर्ट फ्लाईट ची वेळ स॑ध्याकाळी आठ वाजेची..  एन्ट्री केली. इमिग्रेशन ला मराठी मुलं.. एक स्टेप पार केली. परंतु घामाघूम झाले. सगळी प्रोसिजर पूर्ण करून plane मध्ये पाऊल टाकले, गड सर केला होता. पण आता पुढे काय?
   दुसऱ्या दिवशी h.k वेळेनुसार सकाळी सहा वाजता flight land होणार होती. हाँगकाँग ला ऊतरले, आणि माझ्या परीक्षेला सुरूवात झाली. साधारण पणे मला जितके ईन्ग्लिश येत होते. त्याचा तिथे काहीही उपयोग झाला नाही. मला emigretion counter मध्ये  बाजूला केले. कारण माझ्याकडे व्हिसा नव्हता. सर्व भारतीयांना वेटींग रूममध्ये पाठवले.तेथील स्टापला आपले इंग्रजी हि समजत नव्हते. मयूरी तिथे सोशल वर्कर आहे, म्हटल्यावर तिची त्यांनी पुर्णतः माहिती घेतली. जे लोक कुटुंबासह होते, त्यांना ते सोडत होते, माझ्या सारख्या एकटी व्यक्तीला थांबवत होते.
   मयुरी बाहेर वाट बघत होती. कोणाशीही  संपर्क होत नव्हता. मोबाईल बंद झाला होता. ईकडे भारतात ही सगळे घाबरले होते. असे चार तास गेले....
     मग त्या लोकांनी मयुरी शी फोनवर आमच्या नात्याची बरीच माहिती विचारली. ऊलट तपासणी केली म्हटलं तरी चालेल. आणि शेवटी . त्यांनी हसत -हसत मला welcome  केले.
आणि मी स्वतः ला सिद्ध केले.
   ह्या अनुभवातुन एक शिकले की, ह्या जगात काही ही अशक्य नाही..। जेव्हां एकटे प्रवास करतो तेव्हा आपण सुंदर अनुभव घेत असतो. हे कुठल्याही पुस्तकातुन किंवा  कोणाच्याही सोबतीने नाही शिकत..!!


पद्मा साहेबराव...

x

Saturday, September 15, 2018

पु.ल. एक विचार - (एक शून्य मी )

 

 एक  शून्य मी ह्या पुलंच्या पुस्तकातील पुढील विचार आवडला, तो असा   - "आमची दुःख समजणारा नेता आहे, असा विश्वास अनुयायांना वाटत नाही, तोपर्यंत त्या नेतृत्वाला काहीच अर्थ नसतो. "
   खरयं, आजची राजकीय परिस्थिती बघितली की ह्या वाक्याचा अर्थ कसा लावावा हेच कळत नाही .
    पक्ष तर भारंभार आहेत ,स्वतःचाच आत्मगौरव करणारे नेतेही त्या-त्या पक्षांमध्ये आहेत. पण जनतेचा कोणावरही विश्वास नाही.
    समाजात असणारे दैनंदिन प्रश्न, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा , तरुणांना नोकऱ्या ह्या बेसिक गरजा पूर्ण होत नाही, त्याबरोबरच कोणतेही सरकार आले तरी ह्या रोजच्या जीवनातील प्रश्नांना उत्तर किंवा तोडगे निघतच नाहीत. सत्ताधीश व विरोधक यांच्यात तुम्ही काय केलं ,आम्ही काय केलं ,हे कोळसे उगाळण्यात वेळ जातो.समाजाच्या प्रश्नांकडे बघणार कोण ?             
       स्त्रियांवर होणारे अत्याचार, निरपराधांच्या हत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न ,बंद पडत असणारे  उद्योगधंदे त्यामुळे वाढणारी  बेरोजगारी आणि त्यासंबधित  न्यायालयात प्रलंबित असणारे खटले अशा विळख्यात  सामान्य माणूस अडकलाय , आणि राजकीय स्थिती बघता असं कोणतंही नेतृत्व नाही की, ते आम्हाला आमचं वाटावं !
     एकमेकांवर ताशेरे ओढण्यात संसदेतील कार्यकाळ सपंतो .जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा सत्तेची  खुर्ची सांभाळण्यातच  काम काजाची वर्षे निघून जातात. तळागाळातल्या माणसांचा विकास हा  फक्त त्यांच्या निवडणूक जिंकण्यापुरता  गोंडस पण फसवा  अजेंडा असतो.
     "नेमेचि येतो पावसाळा" याप्रमाणे पुन्हा निवडणुकीच्या काळात हेच नेते साम,दाम,दंड,भेद वापरून मतदारांचा बळी घेतात. निवडून कोणीही आले तरी दुःख समजणारा नेता आम्हाला मिळत नाही. आणि दुर्दैव इतकं की, विरोधकही जनतेची बाजू मांडायला तेवढा खंबीर राहिलेला नाही .कधी असंही वाटतं की आपली लोकशाही ही  हुकूमशाहीच्या मार्गावर चालली की काय ?
       म्हणुनच राजकारणात सर्वासोबत चालणाऱ्या नेत्याची निवड व्हायला हवी..ही अस्थिर  व्यवस्था आपण  बदलु शकतो.एक सशक्त मतदार म्हणुन...
 आजच्या तरुणांकडे ,भावी पिढी घडवण्याची मोठी ताकद आहे.कारण आपला देश हा तरूणांचा देश म्हणुन आेळखला जातो..


पद्मा साहेबराव...

Sunday, September 2, 2018

पु.ल.... मला भावलेले!!!

    पु.ल.... मला भावलेले!!!

     देव व धर्म ह्या धूर्त कल्पना सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी  वापरलेल्या आहेत. हेही म्हटले तर पुन्हा पुलंचीच शब्द येतात ,आणि बरोबरही आहे, प्रत्येक ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी शिरकाव केलेला दिसतो आणि देवाबद्दल असलेल्या श्रद्धेपेक्षा विशिष्ट लोकांच्या गटाचा तिथे प्रभाव दिसतो.
      निवडणुकीच्या वेळी या धार्मिक ,श्रद्धाळू भक्तांचा गैरफायदा घेऊन त्यांना आपल्याकडे ओढले जाते. भीतीपोटी लोकही नको असलेल्या समूहांना पाठिंबा देतात. त्याबरोबरच  अधंश्रध्देची  जोड  मिळाल्यावर भोंदू तिथले संस्थानिक होतात. येणारा भक्त त्यांची प्रजा असते. हिच  प्रजा मानसिक गुलाम कधी होते हे  कळत नाही .
    गुलामगिरी स्वीकारल्यावर मग आपण  स्वतंत्रपणे विचारच करत नाही .भोंदूगिरी करणारे बुवा आणि राजकारणी जेव्हा एकत्र येतात ,तिथेच मग सौदेबाजी सुरू होते म्हणून आपण डोळसपणाने देव अनुभवावा , नाहीतर दहा-दहा हजार करोडचे आसाराम बापू कधी तयार होतात,हे भक्तांना कळेपर्यंत फार ऊशीर झालेला असतो.
      म्हणुनच देवावरची भक्ती असो, किवां राजकारणातील शक्ती, हि डोळसपणे तपासायला हवी...  कुठल्याही लाटेत वहावत जाणे..हे धोकेदायक आहे.

पद्मा साहेबराव...